राहुल गांधी, काँग्रेसचे नेते
अशा प्रकारच्या घटनांमुळे देशाची प्रतिमा मलिन होते. उत्तरप्रदेशातील एका शाळेत धर्माच्या नावावर भेदभाव करत एक शिक्षिका मुलाला मारहाण करण्याचे त्याच्या वर्ग मित्राला सांगते, तेव्हा ही बाब भाजप आणि रा.स्व. संघाच्या द्वेषाच्या राजकारणाचा परिपाक आहे. दुसरीकडे सुरक्षा प्रदान करणारा 'आरपीएफ'चा जवान चेतनकुमार हा धर्माच्या नावावर निर्दोष लोकांची हत्या करत आहे. या घटना चिंताजनक आहेत.
मल्लिकार्जुन खर्गे, अध्यक्ष, काँग्रेस
हे गेल्या ९ वर्षांतील प्रॉडक्ट आहे. मुस्लिम व्यक्तीस कोणत्याही कारणाशिवाय मारहाण करता येऊ शकते, अपमानित करता येऊ शकते, हे लहान मुलांच्या मनावर बिंबविले जात आहे. पालकांनी मुलाचे नाव शाळेतून काढले आहे. त्यांनीच हे प्रकरण वाढवू नये, असे लिहून दिले आहे. कारण त्यांना न्याय मिळणार नाही, हे ठाऊक आहे.
खा. असदुद्दीन ओवेसी, 'एमआयएम'चे प्रमुख
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा